Posts

Showing posts from July, 2023

सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले

निकड.. नव्या दमाच्या सत्यशोधकाची! महात्मा जोतिराव फुले यांच्या शतकोत्तर रौप्य स्मृतिवर्षांरंभानिमित्त त्यांच्या वैचारिक आणि कृतीप्रधान वारशाची आज नेमकी काय स्थिती आहे, यावर क्ष-किरण टाकणारा लेख.. २८नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा जोतिराव फुल्यांचे निधन झाले. पुढील वर्षी या घटनेला १२५ वर्षे पूर्ण होतील. यानिमित्ताने अनेक कार्यक्रम होतील. महाराष्ट्राच्या खेडोपाडय़ांत महात्मा फुल्यांची सत्यशोधक चळवळ पोहोचली.. पसरली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात या चळवळीचा प्रवेश झाला. त्यातून समाजात प्रचलित ब्राह्मण्यावर, जातिव्यवस्थेवर, स्त्री-पुरुष भेदाभेदावर, अस्पृश्यतेवर हल्ले झाले. तत्कालीन राजकीय स्वातंत्र्याच्या चळवळीला मूलभूत मानवी स्वातंत्र्याचा आयाम मिळाला. १८८५ साली काँग्रेसची स्थापना झाली. फुल्यांनी मात्र या घटनेचे स्वागत केले नाही. उलट, जाहीर शंका उपस्थित केली. सामाजिक lr07गुलामगिरीचा प्रश्न मांडला. २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. ७३-७४ सालातच राजर्षी शाहू व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जन्मदिन येतात. फुले १८९० साली गेले. १४ एप्रिल १८९१ रोजी       डॉ...

ध्येय

Image
जोपर्यंत माणूस ध्येयाकडे जाणं चालूच ठेवतो तोपर्यंत तो आनंदयात्री असतो. जीवनात सुख किंवा दु:ख येतात आणि जातात. समाधानाचे क्षण येतात तसेच निराशेचेपण येतात. मात्र प्रवास चालूच असायला हवा. हाती घेतलेलं कर्म धर्म मानायचं ही खरी परीक्षा. कालचीच गोष्ट. गौरी (माझी पत्नी) मला सांगत होती, ''महेंद्र, तुला नेमकं काय हवंय ते तू आत्तापर्यंत कधीच ठरवू शकला नाहीस. तू जशी वेळ येईल तसे तुझे उद्योग-व्यवसाय बदलत राहिलास. कोणत्याही एका व्यवसायाशी तू स्वत:ला बांधून ठेवले नाहीस. त्यामुळे यापुढील आयुष्यात आपल्याला नक्की काय करायचं आहे ते ठरवण्याची वेळ आता आली आहे. आणि अजून वेळ गेलेली नाही. तू आत्तासुद्धा हे ठरवू शकतोस.'' ती सांगत होती ते संपूर्णपणे खरं होतं. त्यात काही चुकीचं नव्हतं. तिने एक आठवण यावेळी सांगितली. त्यावेळी आमच्या विवाह संस्थेच्या माझ्या कामात सातत्य नसे. काही दिवस झाले की मला कामाचा कंटाळा येई. त्यामुळे तिची चिडचीड होणं स्वाभाविक होतं. तेव्हा आम्ही दोघं डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा ते गौरीला म्हणाले होते, ''हे बघ, ही विवाहसंस्था हे तुझं कर्म आहे आणि कर...

प्रसाद बसवेश्वर चौगुलेउपजिल्हाधिकारी (MPSC २०१९)

Tips for MPSC Preparation  by Topper Mr.Prasad Chougule... नमस्कार मित्रांनो,       खूप साऱ्या विदयार्थी मित्रांचे फोन कॉल व मेसेज येत आहेत की सध्याच्या परिस्थिती मध्ये नक्की काय strategy असावी.त्यातील काही शंकांचे निरसन करण्याचा हा प्रयत्न...       २०२० हे वर्ष मावळतीकडे जात आहे. खास करून स्पर्धा परीक्षा करण्याऱ्या मित्रमैत्रिणीनसाठी तर हे वर्ष निराशाजनक च म्हणावे लागेल. राज्यसेवा आणि PSI 2019 चा निकाल आणि AMVI Pre exam सोडून इतर कोणतीही घटना परीक्षार्थीच्या दृष्टीने झाली नाही. जीव ओतून अभ्यास करून देखील जर परीक्षा होत नसेल आणि कधी होईल याची शाश्वती नसेल तर ते एक uncertain वातावरण तयार करते.       Charles Darwin चा " Survival of the Fittest" चा सिद्धांत सर्वांनी अभ्यासला आहे. तो सध्याच्या परिस्थितीत खूप relevant आहे. जो स्वतःला बदलेल्या परिस्थितीनुसार Adjust करून घेईल तोच या survival च्या race मध्ये टिकून राहील. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील स्वतःला परिस्थितीनुसार बदलले पाहिजे.        ...

STI पूर्वपरीक्षा स्पेशल

STI पूर्वपरीक्षा स्पेशल:- भाग:-०१ ०१) नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई गाझामधील संयुक्त राष्ट्रांच्या शाळांच्या पुर्नबांधणी किती हजार डॉलर दान करणार आहे? == ५० हजार डॉलर ०२) जम्मू काश्मीरमधील पूरग्रस्तांसाठी भारत तिबेट सीमा पोलिसांनी (ITBP) किती मदत केली आहे? == २ कोटी ९१ लाख रुपये ०३) केंद्र सरकारने गहूचा किमान हमीभाव ५० रुपयांनी वाढवून प्रति क्विंटलसाठी किती केला आहे? == १,४५० रु. ०४) आझाद हिंद सेनेत काम केलेल्या कोणत्या जेष्ठ स्वातंत्रसैनिकाचे नुकतेच निधन झाले आहे? == जगदीश शरण पांडे ०५) ब्रॅडमन हॉल ऑफ फेम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले दोन क्रिकेटपटू कोण? == सचिन तेंडूलकर आणि स्टीव वॉ ०६) केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रायोगिक तत्त्वावर कोणत्या चार भारतीय भाषांमध्ये मोफत एसएमएस बातम्या ऑल इंडिया रेडियो (एआईआर) द्वारे दिल्या जाण्याची घोषणा केली आहे.ही योजना ‘डिजिटल इंडिया’चाच एक भाग आहे? == गुजराती, आसामी, तामिळ आणि मल्याळम(या अगोदर हिंदी, मराठी, संस्कृत, डोगरी व नेपाली या भाषांत) ०७) आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस कधी साजरा केला जातो? == २९ ऑक्टोबर( २...